आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे, असं आपलं संविधान सांगतं. तरीही भारतातील कित्येक लोकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा मिळवणेही अशक्य कोटीतील गोष्ट वाटते. आपल्या आजूबाजूचा समाज दुर्धर आजाराने ग्रस्त असताना केवळ पैशाअभावी त्यांच्या उपचारांची हेळसांड होते, हे कुणाही संवेदनशील माणसाला खटकण्यासारखं आहे. म्हणूनच श्री गुरू गौतम मुनींच्या प्रेरणेतून पुण्यात ‘श्री गुरू गौतम मुनी चॅरिटेबल ट्रस्ट’ या नावाने एक संस्था सुरू झाली. मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना कमीत कमी खर्चात आरोग्यसेवा उपलब्ध करून देणं, हा या संस्थेचा मुख्य हेत